दैववाद की प्रयत्नवाद

         समय से पहले और भाग्य से ज्यादा किसीको कुछ नही मिलता, हे वाक्य बर्याच ठिकाणी लिहिलेलं आढळतं. तत्वज्ञान म्हणून त्यात तथ्यांश असेलही. पण बर्याचदा आपलं अपयश लपवण्याची ढाल म्हणूनच या वाक्याचा उपयोग केला जातो. जगातलं सगळंच तत्वज्ञान आपल्या सोयीपुरतं वापरणारी लोक समाजात असतात. आयुष्यात ज्याला धन कमावता येत नाही, तो जगाला गरीबीचं तत्वज्ञान शिकवत असतो. तत्वज्ञान जगण्याला बळ देतं. पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या तत्वाची कुबडी घेतलीत की, जीवन पंगू होतं. आपली अकर्मण्यता झाकण्यासाठी कोणी भाग्याआड लपत असेल, तर ते चूक आहे.

samay-se-pahale-aur-bhagya-se-jyada
samay-se-pahale-aur-bhagya-se-jyada

                वनवास प्राप्त झाल्यावर रामाने दैवाच्या श्रेष्ठत्वाचा  युक्तीवाद लक्ष्मणासमोर केला होता. तेव्हा लक्ष्मण म्हणतो, विक्लबो वीर्यहीनो यस्स दैवमनुवर्तते। वीरास्सम्भावितात्मानो न दैवं पर्युपासते।। दुबळे आणि भेकडच दैवाचा आश्रय घेतात. ज्यांचा स्वाभिमान जिवंत असतो, असे सामर्थ्यवान पुरूष दैवावर विसंबत नाहीत. कोणत्याही कार्याची सिद्धी करताना, जे जे आणि जसे करायला हवे, तसे सर्व करूनही अपयश पदरात येतं, तेव्हा जर कोणी अपयशाची जबाबदारी दैवावर ढकलत असतील, तर ते समजू शकते. परंतु काहीच प्रयत्न न करणारे अपयश पदरात पडल्यावर राजरोसपणे दैवाच्या नावाने बोटे मोडतात. हा दैववाद नाही, पलायनवाद आहे. प्रयत्नवाद्यांना प्रयत्न करण्याला बळ मिळावं, म्हणून भाग्य संकल्पना वापरायला हवी.

                अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।। कोणत्याही कार्याच्या यशासाठी या पाच गोष्टी जूळून आल्या पाहिजेत, असे श्रीमद्भगवद्गीता सांगते. कार्याचं अधिष्ठान, कर्ता, त्यासाठी उपलब्ध असणारी साधने, त्यासाधनांच्या साह्याने केलेले प्रयत्न या चार गोष्टी जुळून आल्यानंतर दैव आपोआपच अनुकूल होतं. हे असं करूनही जर अपेक्षित यश मिळत नसेल, तर त्याला दैवयोग म्हणावं. आजकाल आपल्याकडे या पहिल्या चार गोष्टींचाच पत्ता नसतो. लोक थेट दैवावरच घसरतात. आईबापांना न विचारता पळून जाऊन लग्न करतात. भांडण झालं की, भाग्याला नाव ठेवतात. दैवाचा खरा अर्थ माहित नसल्याने,  कृतिशून्य लोक विनाकारण दैवाच्या नावाने बोंबा मारतात. राजाला गरीबीचं स्वप्न पडलं, तर तो स्वत:ला गरीब समजायला लागतो. वास्तवात तो गरीब नसतो. माऊली म्हणतात, कां निद्राभरें बहूवें । राया आपणपें ठाऊवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं
रमेश वाघ, नाशिक
संपर्क ९९२१८१६१८३
दैववैद की प्रयत्नवाद
दैववैद की प्रयत्नवाद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या